श्रीखंड भाग २
मागील भागात आपण श्रीखंड तयार करण्याची पद्धत बघितली. भीमसेनाने शोधलेल्या या व्यंजनाचे आजकाल अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आयुर्वेद सांगतो की दुध आणि फळे एकत्र खाणे हे विरुद्धाहार आहे. पण श्रीखंडाच्या बाबतीत ते अगदी विरुद्ध असे म्हणता येणार नाही. चक्का आणि फळे अम्ल रसाची असल्याने काही प्रमाणात आपण हे combination करू शकतो. flavor येईल इतकाच pulp किंवा रस घालावा.
फळांचे रस ज्याठिकाणी वापरावयाचे आहेत त्याठिकाणी त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या ( seasonal fruits ) चा च वापर करावा व फळे ताजीच वापरावीत. शिवाय बाहेर मिळणारे fruit pulp , powders, juices किंवा essence हमखास टाळावे. कारण या सर्व गोष्टी टिकवण्यासाठी त्यामध्ये preservatives चा वापर केलेला असतो. कितीही 'herbal' वाटत असले तरी preservatives शिवाय या गोष्टी टिकूच शकत नाहीत. पूर्वीपासून आपल्याकडे पदार्थ टिकवण्यासाठी मीठ किंवा साखर यांचा वापर केला जातो. परंतु मूळ पदार्थाची चव टिकवून आपली चव न जाणवू देणे हे तसं कठीणच ना ! म्हणून हल्ली sodium salt of benzoic acid म्हणजे Sodium benzoate! हे काका आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. उदा; लोणचे, jam, fruit juices, sauce,इ. आणि म्हणतात ना " अतिपरिचयादवज्ञा " या उक्तीप्रमाणे याच्या वारंवार सेवनाने कालांतराने शरीरावर अनेक परिणाम दिसू लागतात जसे स्थूलता, रक्तदाब, मधुमेह, अकाली केस पांढरे होणे, इ ( याबद्दल स्वतंत्र लेख). मग हळूहळू आपण त्यांना टाळायला शिकले पाहिजे. ते येताना दिसले की रस्ता बदलून टाकायचा. त्याच बरोबर synthetic colors चा देखील वापर टाळावा. मुळातच निसर्गात इतके नैसर्गिक रंग उपलब्ध असतांना आपण तेच का वापरू नये? उदा; आम्रखंड बनवताना original आंब्याचा रस च वापरला तर..? रंग ही छान येईल आणि चव तर काय आहा!!
बरं! असो!तर श्रीखंड बनविण्याकरिता आपण काही प्रयोग नक्कीच करू शकतो. एक मीही केलाय.
गुलकंद-श्रीखंड
चक्का तयार करण्याची पद्धत तर आपण बघितलीच आहे. तर चक्का घ्यावा.
खडीसाखर बारीक करून त्यामध्ये चवीनुसार घालावी.
मिश्रण चांगले फेटून घ्यावे.
त्यामध्ये गुलकंद घालून पुन्हा फेटून घ्यावे.
रंग हवा असल्यास बीटाचे ५-६ थेंब किंवा केशर घालावे.
त्यामध्ये विलायची पूड, मिरेपूड, जायफळ घालावे.
गुलकंद घातल्याने एक वेगळीच जिभेवर रेंगाळणारी चव येते. याचप्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे seasonal fruit फळांचा राजा आंब्याचा रस, गुलाब पाकळी, dry fruits, विलायची जायफळ, ओले खोबरे घालूनही लज्जतदार श्रीखंड बनवू शकतो. तर करून पहा. शिवाय आपल्याकडच्या गृहिणी इतक्या हुश्शार आणि innovative असतात की त्या नक्कीच आणखी काही पद्धती शोधणार किंवा शोधल्याही असतील. तर त्याही जरूर share करा.
पदार्थ कितीही नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असला तरी तो प्रमाणात खाणे च योग्य. आवडणारी गोष्ट अतिप्रमाणात खाणे केव्हाही घातकच. शिवाय काही व्याधींमध्ये काही पदार्थ हे वर्ज्य केलेले असतात. अशा वेळी अपथ्य सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.
प्रतिक्रिया जरूर कळवा.
वैद्य रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक जळगाव.
८२३७५०१५३१
मागील भागात आपण श्रीखंड तयार करण्याची पद्धत बघितली. भीमसेनाने शोधलेल्या या व्यंजनाचे आजकाल अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आयुर्वेद सांगतो की दुध आणि फळे एकत्र खाणे हे विरुद्धाहार आहे. पण श्रीखंडाच्या बाबतीत ते अगदी विरुद्ध असे म्हणता येणार नाही. चक्का आणि फळे अम्ल रसाची असल्याने काही प्रमाणात आपण हे combination करू शकतो. flavor येईल इतकाच pulp किंवा रस घालावा.
फळांचे रस ज्याठिकाणी वापरावयाचे आहेत त्याठिकाणी त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या ( seasonal fruits ) चा च वापर करावा व फळे ताजीच वापरावीत. शिवाय बाहेर मिळणारे fruit pulp , powders, juices किंवा essence हमखास टाळावे. कारण या सर्व गोष्टी टिकवण्यासाठी त्यामध्ये preservatives चा वापर केलेला असतो. कितीही 'herbal' वाटत असले तरी preservatives शिवाय या गोष्टी टिकूच शकत नाहीत. पूर्वीपासून आपल्याकडे पदार्थ टिकवण्यासाठी मीठ किंवा साखर यांचा वापर केला जातो. परंतु मूळ पदार्थाची चव टिकवून आपली चव न जाणवू देणे हे तसं कठीणच ना ! म्हणून हल्ली sodium salt of benzoic acid म्हणजे Sodium benzoate! हे काका आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. उदा; लोणचे, jam, fruit juices, sauce,इ. आणि म्हणतात ना " अतिपरिचयादवज्ञा " या उक्तीप्रमाणे याच्या वारंवार सेवनाने कालांतराने शरीरावर अनेक परिणाम दिसू लागतात जसे स्थूलता, रक्तदाब, मधुमेह, अकाली केस पांढरे होणे, इ ( याबद्दल स्वतंत्र लेख). मग हळूहळू आपण त्यांना टाळायला शिकले पाहिजे. ते येताना दिसले की रस्ता बदलून टाकायचा. त्याच बरोबर synthetic colors चा देखील वापर टाळावा. मुळातच निसर्गात इतके नैसर्गिक रंग उपलब्ध असतांना आपण तेच का वापरू नये? उदा; आम्रखंड बनवताना original आंब्याचा रस च वापरला तर..? रंग ही छान येईल आणि चव तर काय आहा!!
बरं! असो!तर श्रीखंड बनविण्याकरिता आपण काही प्रयोग नक्कीच करू शकतो. एक मीही केलाय.
गुलकंद-श्रीखंड
चक्का तयार करण्याची पद्धत तर आपण बघितलीच आहे. तर चक्का घ्यावा.
खडीसाखर बारीक करून त्यामध्ये चवीनुसार घालावी.
मिश्रण चांगले फेटून घ्यावे.
त्यामध्ये गुलकंद घालून पुन्हा फेटून घ्यावे.
रंग हवा असल्यास बीटाचे ५-६ थेंब किंवा केशर घालावे.
त्यामध्ये विलायची पूड, मिरेपूड, जायफळ घालावे.
गुलकंद घातल्याने एक वेगळीच जिभेवर रेंगाळणारी चव येते. याचप्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे seasonal fruit फळांचा राजा आंब्याचा रस, गुलाब पाकळी, dry fruits, विलायची जायफळ, ओले खोबरे घालूनही लज्जतदार श्रीखंड बनवू शकतो. तर करून पहा. शिवाय आपल्याकडच्या गृहिणी इतक्या हुश्शार आणि innovative असतात की त्या नक्कीच आणखी काही पद्धती शोधणार किंवा शोधल्याही असतील. तर त्याही जरूर share करा.
पदार्थ कितीही नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असला तरी तो प्रमाणात खाणे च योग्य. आवडणारी गोष्ट अतिप्रमाणात खाणे केव्हाही घातकच. शिवाय काही व्याधींमध्ये काही पदार्थ हे वर्ज्य केलेले असतात. अशा वेळी अपथ्य सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.
- गुलकंद हे शीत गुणाचे असल्याने उन्हाळ्यातउपयुक्तआहे.
- वारंवार पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तीस लाभदायक.
- शिवाय श्रीखंडाचे गुणही अपेक्षित आहेतच.
- परंतु अतिप्रमाणात खाल्ल्याने अग्निमांद्य करू शकते. शेवटी अति सर्वत्र वर्जयेत्|
प्रतिक्रिया जरूर कळवा.
वैद्य रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक जळगाव.
८२३७५०१५३१
Innovative concept
ReplyDeleteVery good .waiting nxt
ReplyDeleteThank you.. :)
DeleteWaa gulkandkhand banvave lagel aata
ReplyDeleteHa ha ho... :)
DeleteWaa gulkandkhand banvave lagel aata
ReplyDeleteGulkand flavor😋wow mast
ReplyDeleteKr aparna ani mala pathav.. :P
DeleteGulkand flavor😋wow mast
ReplyDelete✌️✌️Laiiiii bhariiiii
ReplyDelete