Thursday, May 31, 2018

आ..आंब्याचा....!


                                                                          आ..आंब्याचा....!
                                                  



                                                नमस्कार!  Blog post करण्यात काही कारणामुळे उशीर झाला. त्याबद्दल खरच दिलगिरी व्यक्त करते. असो! पण आपण हा सगळा backlog भरून काढूया.
                                                  सध्या तर सूर्यनारायण एकदम प्रसन्न आहेत सर्वांवर. परंतु उन्हाळा सुखद वाटतो तो एका गोष्टीमुळे तो म्हणजे फळांचा राजा आंब्याचे आगमन. आंबा कुणाला आवडत नाही अशी व्यक्ती दुर्मिळच आणि समजा असेलच तर त्याला स्वर्गसुख उपभोगता येत नाही अस म्हणायला हरकत नाही ( थोडी अतिशयोक्ती वाटेल पण खरे आहे ते.) आजकाल "आम हर मौसम मिले है|" असे असले तरी या दिवसात आंब्याला जी चव असते ती नंतर कशी हो असणार? शिवाय आपण मागे बघितलय ना कि seasonal फळे खायचीत म्हणून. तीही ताजी. म्हणूनच आपण या ब्लॉग मध्ये आंबा आणि कैरी यांचे गुण बघूया.

बहुगुणी आंबा :

आंब्याचा मोहोर :
थंड, रुची उत्पन्न करणारा, वातकारक, अतिसार, कफ पित्त, प्रमेह, व दुष्ट रक्त नाहीसे करतो.

कोवळा आंबा :
तुरट, आंबट, रुचीकर, व वातपित्तकर आहे.

कच्चा आंबा :
आंबट व रुक्ष असून त्रिदोष व राक्तविकारनाशक  आहे.

पिकलेला आंबा:
गोड, बल देणारा, स्निग्ध, आल्हाददायक, पचण्यास जड, हृद्य, वर्ण खुलवणारा, पित्तकर नाही.

झाडावर पिकलेला आंबा :
जड, वातनाशक, मधुर, आंबट, व किंचित पित्त वाढविणारा आहे.

आंबा अतिशय उपयुक्त आहे.असा एकही भाग नाही जो औषधी नाही.

त्यामध्ये fats चे प्रमाण कमी आहे. sodium चे देखील. शिवाय cholesterol ची भीती नाही.
Vit A, B,C, E आणि K असतात.

शिवाय calcium, manganese, magnesium, zinc असते.
सीझन मध्ये खाऊन तुम्ही शरीरात vit B साठवून ठेऊ शकतात.

कैरी आणि आंबा यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. का? तर त्यावर संस्कार होतो उष्णतेचा.

आयुर्वेदात सांगिलेले आहे..
 संस्काराने गुणात बदल होतो. माणूस ही संस्कारांनीच घडतो. मातीच्या गोळ्याला सुद्धा संस्कार झाल्यावरच सुंदर असे मडके तयार होते. तसेच आहे. सुर्यताप, उष्णता यांचा संस्कार म्हणजेच काय तर प्रक्रिया झाल्यावर गुणवृद्धी होते. म्हणून आंबा त्याच्या कलिका अवस्थेपासून पक्व अवस्थेपर्यंत एवढेच काय तर बीज सुद्धा उपयुक्त आहे फक्त वेगवेगळ्या अवस्थेत.

निसर्गाच्या कोणत्याही गोष्टीवर कोणत्या पद्धतीची प्रक्रिया यावर गुणधर्म ठरतात. आजकाल आपल्यापर्यंत येणाऱ्या फळांवर फवारणी झालेली असते. त्यामुळे गुणांमध्ये नक्कीच बदल होतो. त्यामुळे घेतानाच आपण सेंद्रिय  फळे घेतली तर नक्कीच अपेक्षित फायदा होऊ शकतो.

शिवाय एका ठराविक पद्धतीने आंबा किंवा कैरी चे वेगवेगळे पदार्थ बनवून ठेवण्याची पद्धत आहे. तर उन्हात वाळवलेले पदार्थ, साखरेच्या पाकात किंवा मिठात करून ठेवण्यापर्यंत ठीक आहे परंतु pulp साठवणे, किंवा विकत घेतलेले लोणचे असे पदार्थ करण्यासाठी preservatives वापरलेले असते तर यापेक्षा ताजी आणून खाणे व लोणचे, गूळ/साखर आंबा घरी तयार करून खाणे योग्य.

आंबा हे फळ च मुळात glamorous झालेले आहे. त्यामुळे सर्रास कोणत्याही पदार्थात वापरला जातो आहे. परंतु असे करताना साध्या भाषेत सांगायचं तर deadly combinations असतात हो! तर आपण असे खात असतांना वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया होत असतात त्याचा नक्की विचार करावा.

आणि खाताना अति मात्रेत नेहमीच घातक असते. म्हणून खा पण काळजी पण घ्या.

Happy Mango Season!!!

होळी रे होळी पुरणाची पोळी

                                                          होळी रे होळी  पुरणाची पोळी                                होळी रे होळी पुरणाची पोळ...