Showing posts with label Treasure of Ayurved. Show all posts
Showing posts with label Treasure of Ayurved. Show all posts

Saturday, April 2, 2022

शर्करोदक

शर्करोदक




थंड पाण्यात आवडीनुसार खडीसाखर मिसळून, किंचित लवंग,कापूर, मिरे आणि विलायची घालावी.

या तयार केलेल्या झालास शर्करोदक असे म्हणतात. यास म्हणजे माठातील थंड पाणी घेणे अपेक्षित आहे. 

शर्करोदक शुक्र हा शरीरातील अतिशय महत्वाचा धातू वाढवण्यास मदत करते,

गुणांनी थंड आहे

पोट साफ होण्यास मदत करते

बल देणारे आहे

रुचकर आहे

उन्हाळ्यात येणारा थकवा अंगाची होणारी लाही लाही, ताप,वारंवार तहान लागणे यावर उत्तम गुणकारी आहे

यामुळे लगेचच तरतरी येण्यास मदत होते.

मधुर रसाचे आणि थंड गुणाचे असल्याने दूषित वातपित्त कमी करते.


Cold water , cooled in earthen pot. Mix raw sugar in it as per taste, add a clove, a pinch of  bhimseni camphor, pinch of black pepper, cardamom. The  water is knowon as Sugar water.

It helps to increase the Shukra, a very important Dhatu in human body

Its a natural coolant

Acts as mild laxative

Helps in strengthening body tissues

A very refreshing drink dring the long & tiring days of summer

As a stimulant, it provides glucose to body tissues

Being sweet & cool in nature it reduces vitiated Vata & Pitta


वैद्य सौ रेवती गर्गे

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक,जळगाव.

8010454807

(पोस्ट लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही.)

Wednesday, April 11, 2018

रस गोडी तैसा स्वाद...रसाला..!

                                               श्रीखंड भाग २
                                                            
              मागील भागात आपण श्रीखंड तयार करण्याची पद्धत बघितली. भीमसेनाने शोधलेल्या या व्यंजनाचे आजकाल अनेक प्रकार उपलब्ध आहेत. आयुर्वेद सांगतो की दुध आणि फळे एकत्र खाणे हे विरुद्धाहार आहे. पण श्रीखंडाच्या बाबतीत ते अगदी विरुद्ध असे म्हणता येणार नाही. चक्का आणि फळे अम्ल रसाची असल्याने काही प्रमाणात आपण हे combination  करू शकतो. flavor येईल इतकाच pulp किंवा रस घालावा.
              फळांचे रस ज्याठिकाणी वापरावयाचे आहेत त्याठिकाणी त्या त्या ऋतूमध्ये मिळणाऱ्या ( seasonal fruits ) चा च वापर करावा व फळे ताजीच वापरावीत. शिवाय बाहेर मिळणारे fruit pulp , powders, juices किंवा essence हमखास टाळावे. कारण या सर्व गोष्टी टिकवण्यासाठी त्यामध्ये preservatives चा वापर केलेला असतो. कितीही 'herbal' वाटत असले तरी preservatives शिवाय या गोष्टी टिकूच शकत नाहीत. पूर्वीपासून आपल्याकडे पदार्थ टिकवण्यासाठी मीठ किंवा साखर यांचा वापर केला जातो. परंतु मूळ पदार्थाची चव टिकवून आपली चव न जाणवू देणे हे तसं कठीणच ना ! म्हणून हल्ली sodium salt of benzoic acid म्हणजे Sodium benzoate! हे काका आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. उदा; लोणचे, jam, fruit juices, sauce,इ. आणि म्हणतात ना " अतिपरिचयादवज्ञा " या उक्तीप्रमाणे याच्या वारंवार सेवनाने कालांतराने  शरीरावर अनेक परिणाम दिसू लागतात जसे स्थूलता, रक्तदाब, मधुमेह, अकाली केस पांढरे होणे, इ ( याबद्दल स्वतंत्र लेख). मग हळूहळू आपण त्यांना टाळायला शिकले पाहिजे. ते येताना दिसले की रस्ता बदलून टाकायचा. त्याच बरोबर synthetic colors चा देखील वापर टाळावा. मुळातच निसर्गात इतके नैसर्गिक रंग उपलब्ध असतांना आपण तेच का वापरू नये? उदा; आम्रखंड बनवताना original आंब्याचा रस च वापरला तर..? रंग ही छान येईल आणि चव तर काय आहा!!
             बरं! असो!तर श्रीखंड बनविण्याकरिता आपण काही प्रयोग नक्कीच करू शकतो. एक मीही केलाय.

गुलकंद-श्रीखंड


चक्का तयार करण्याची पद्धत तर आपण बघितलीच आहे. तर चक्का घ्यावा.

खडीसाखर बारीक करून त्यामध्ये चवीनुसार घालावी.


मिश्रण चांगले फेटून घ्यावे.


त्यामध्ये गुलकंद घालून पुन्हा फेटून घ्यावे.


रंग हवा असल्यास बीटाचे  ५-६ थेंब किंवा केशर घालावे.

त्यामध्ये विलायची पूड, मिरेपूड, जायफळ घालावे.


         गुलकंद घातल्याने एक वेगळीच जिभेवर रेंगाळणारी चव येते. याचप्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे seasonal fruit फळांचा राजा आंब्याचा रस, गुलाब पाकळी, dry fruits, विलायची जायफळ, ओले खोबरे  घालूनही लज्जतदार श्रीखंड बनवू  शकतो. तर करून पहा. शिवाय आपल्याकडच्या गृहिणी इतक्या हुश्शार आणि innovative असतात की त्या नक्कीच आणखी काही पद्धती शोधणार किंवा शोधल्याही असतील. तर त्याही जरूर share करा.
                           पदार्थ कितीही नैसर्गिक पद्धतीने बनवलेला असला तरी तो प्रमाणात खाणे च योग्य. आवडणारी गोष्ट अतिप्रमाणात खाणे केव्हाही घातकच. शिवाय काही व्याधींमध्ये काही पदार्थ हे वर्ज्य केलेले असतात. अशा वेळी अपथ्य सेवन होणार नाही याची काळजी घ्यावी. तज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.

  • गुलकंद हे शीत गुणाचे असल्याने उन्हाळ्यातउपयुक्तआहे.
  • वारंवार पित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तीस लाभदायक.
  • शिवाय श्रीखंडाचे गुणही अपेक्षित आहेतच.
  • परंतु अतिप्रमाणात खाल्ल्याने अग्निमांद्य करू शकते. शेवटी अति सर्वत्र वर्जयेत्|


प्रतिक्रिया जरूर कळवा.
            

वैद्य रेवती गर्गे
त्रिदल आयुर्वेद क्लिनिक जळगाव.
8010454807


                                             

Saturday, April 7, 2018

रस गोडी तैसा स्वाद...रसाला..!


                                                                      ब्रह्मकर्म समाधिना.....!


                                               सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! आणि
                                               दिनविशेष म्हणजे जागतिक आरोग्य दिनाच्या आरोग्यमयी शुभेच्छा !!
                                               मी वैद्य सौ रेवती गर्गे आजपासून इंटरनेट च्या चावडीवर म्हणजे ब्लॉग च्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे आणि विषय अगदी तुमच्या माझ्या आवडीचा आहे. तसं नाव वाचून थोडाफार अंदाज आला असेलच...! अगदी बरोबर "खाणे"...!
                                                हो ना? आहे ना आवडता विषय..? हं बरं मग याठिकाणी आपण बघणार आहोत आयुर्वेदाच्या काही आहार पद्धती. अहो आयुर्वेद म्हणजे फक्त जडी बुटी नाही. तर आपल्या या प्राचीन शास्त्रात
 सर्व गोष्टीचा विचार केला गेलाय.  अगदी सकाळी उठल्यापासून काय करावे काय खावे कसे खावे इ.
                                               
                                                                 स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् |
                                                                 आतुरस्य विकारप्रशमनम् ||

                                                 म्हणजेच काय तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व आजारी व्यक्तीचा विकार दूर करणे.  आणि म्हणूच आयुर्वेदात काय करावे काय करू नये, काय खावे काय खाऊ नये, इ  गोष्टींचा उत्तम विचार मांडलेला आहे. आजकाल बदललेली दिनचर्या आणि बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयी (दुर्दैवाने यांचे  inverse relation आहे) यामुळे अनेक आजारांना खुले निमंत्रण आहे. म्हणून आपण थोडा विचार करून आपल्या आहाराच्या  काही सवयी बदलणे किंवा काही नवीन लावून घेणे ही काळाची गरज आहे. आपल्या आयुर्वेदात अशा खूप छान छान पौष्टिक recipes सांगितलेल्या आहेत किंवा काही आपल्या नेहमीचे पदार्थ  करण्याची पद्धत थोडी वेगळी सांगितली आहे. इतकेच नाही तर त्याचे गुणधर्म काय आहेत त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हेदेखील सांगितलेले आहे.
                                                  जेवण किंवा अन्नसेवन हे केवळ उदरभरण नाही तर हे एक यज्ञकर्म आहे. असे साक्षात् समर्थ रामदासांनी सांगितलेले आहे. भगवद्गीतेत ब्रह्मकर्म सांगितलेले आहे. बरोबरच आहे की, आपले पोट म्हणजे काय dustbin आहे का? आपण काय खातो त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो अपाय होतो कि फायदा होतो कि उपाय? हे आपल्याला माहित नको?
                                                   आजकाल तर आपल्यासमोर किती किती options असतात. "खाण्यासाठी जन्म आपुला" म्हणतच चाललाय कि सगळं. पण... असं करत असतांना आपण अनेकदा अशाही गोष्टी खात पीत असतो ज्याचा शरीराला फायदा कमी अन् तोटाच अधिक असतो.
                                                     यज्ञ करताना आहुती देताना आपण पेट्रोल किंवा रॉकेल का नाही वापरत? त्यानेही तर अग्नी प्रज्वलित होतच की...भडकाच होतो उलट. की ज्या काळात यज्ञपद्धती सांगितली गेली त्या काळात या गोष्टी माहित नसतील असं वाटत? नाही...उलट ते ऋषीमुनी सर्वज्ञानी होते. सृष्टीचा अभ्यास त्यांचा अधिक होता. परंतु गोघृत वापरण्यामागचे कारण असे की, ज्याप्रमाणे गोघृत सात्त्विक आहे, शुभ आहे त्याप्रमाणे यज्ञाचे फलित प्राप्त व्हावे. शिवाय जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या शरीरातही अग्नी असतो जो अन्नपचनाचे काम करत असतो त्याचाही भडका होऊ द्यायचा नसतो की विझुही द्यायचा नसतो तर हळुवारपणे फुलवायचा असतो. पण काही खाताना आपण एवढा विचार करतो का...??
                                                        परंतु अनादि काळापासून आपल्या संस्कृतीत असा विचार केला गेलेला आहे. याठिकाणी आपण असेच काही व्यंजन बघणार आहोत ज्याचे आयुर्वेदात वर्णन केलेले आहे. त्याचे गुणधर्म बघूया शिवाय त्याचे काही modifications किंवा प्रकार असतील तर त्याचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. उदा; आजकालचे trendy Ready to eat किंवा खोलो-घोलो-पिलो सारखे पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम होतो हेही बघण्याचा प्रयत्न करूया.
                                                       
                                                                    श्रीखंड भाग १
                                                     
                                                          सुरुवात काहीतरी sweet dish ने करावी म्हणून श्रीखंड.  श्रीखंड हा गुजरात व महाराष्ट्रीयन पदार्थ मानला जातो. महाभारतात भीमाने श्रीखंडाचा शोध लावला असे मानले जाते. महाभारतात अशी एक कथा आहे की एकदा श्रीकृष्ण भीमाला भेटायला गेले तेव्हा भीमाने त्यांना रसाला अर्थात् श्रीखंड खायला दिले. ते श्रीकृष्णाला खूप आवडले. ते त्यांनी भरपूर खाल्ले आणि बलवान झाले.
                                                     
  • आंबट दही विशेषकरून म्हशीच्या दुधापासून तयार केलेले दही घ्यावे. 
  • दह्याची  पुरचुंडी बांधून रात्रभर उंचावर टांगून ठेवावे ( त्यातील पूर्ण पाणी निघून जावे हा उद्देश).
  • त्या दह्यातील पूर्ण पाणी निघून गेल्यारच त्याला खाली येण्याची परवानगी  द्यावी.
  • त्यात साखर अं हं खडीसाखर बारीक करून घालावी.
  • त्यानंतर ते मस्त फेटून घ्यावे.
  • त्यात चवीला वेलायची, किंचित मिरे, जायफळ, घसघशीत सुकामेवा घालावे. किंचित् केशराचा केशरिया रंग श्रीखंडाचे सौंदर्य आणखी खुलवेल.
       
    
      कथेमध्ये श्रीखंडाचे जसे गुण सांगितलेले आहेत तसेच ते आहे.
  • जे कृश असतील त्यांना ग्रीष्म आणि शरद ऋतू मध्ये बाल देणारे आहे.
  • वात आणि पित्ताच्या तक्रारी दूर करते.
  • तहान, जळजळ ई वर उपयुक्त.
  • चक्का बल देणारा, साखर पित्तनाशक, मिरे व विलायची रुचीकर व पचनास मदत करणारी आहे. 
  • पुढील भागात आपण श्रीखंडाचे वेगवेगळे प्रकार पाहूया.  


                                                       

                                                  

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...