Tuesday, April 29, 2025

कैरीची डाळ आणि पन्हे

                       कैरीची डाळ आणि पन्हे


अन्नपूर्णेचा आशिर्वाद रहावा म्हणून नवीन लग्न झालेली नवरी आपल्यासोबत अन्नपूर्णेची मूर्ती घेऊन येते. ते घर अन्न धान्याने भरलेले रहावे, समृद्ध रहावे म्हणून जणू काही ती पाठराखण म्हणूनच सोबत येते आणि मग वेगवेगळ्या वेळी या अन्नपूर्णेची वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. अन्नपूर्णा पार्वतीचे रुप! म्हणजे गौरी! एकदा भगवान शंकर भौतिक जगाला अन्नासह भ्रम असे म्हणाले तेव्हा पार्वतीला राग आला आणि ती गायब झाली. जगातील अन्नधान्य सुद्धा गायब झाले. सगळीकडे दुष्काळ पसरला. नंतर मात्र सृष्टीचे चे हाल बघून देवीला दया आली आणि  ती अन्नपूर्णेच्या रुपात प्रकट झाली त्यावेळी भगवान शंकर देखील तिच्याकडे भिक्षा मागायला आले. अशी कथा आहे. आपण सर्वांनी ते चित्र देखील बघितले आहे.  

असे हे अन्नपूर्णा गौरीचे रूप त्यामुळे वेगवेगळ्या काळात तिची पूजा केली जाते. श्रावणात मंगळागौर, मार्गशिर्षात उत्तर भारतात तर चैत्रात चैत्र गौरीचे पूजन महाराष्ट्रात , कर्नाटकात केले जाते. राजस्थानात होळीपासून चैत्र महिना सुरु होतो. या दिवशी गणगौर बसवतात. होळीच्या राखेचे आणि शेणाचे मुटके म्हणजे देवीचे प्रतिकात्मक रूप. तर गव्हाच्या ओंब्या आणि हळद यांनी पूजा केली जाते. ज्वारीच्या कणसाला पांढरा दोरा म्हणजे शंकर तर एका कणसाला लाल पिवळा धागा बांधला जातो म्हणजे पार्वती. हे गौरीचे प्रतिक मानले जाते. यावेळी चुरमा आणि लिंबाच्या डहाळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो. 

आदिवासी भागातही चैत्र गौरीचे पूजन केले जाते. ६ दिवस आधी वेगवेगळी धान्ये पेऊन नंतर देवीचे पूजन केले जाते. थोडक्यात अन्नपूर्णा ती! तिचे पूजन अन्नधान्य , फळे तिला अर्पण करून तिच्याप्रती कृतज्ञ भाव दर्शवण्याच्या विविध पद्धती रूढ झालेल्या दिसून येतात. ऋग्वेदामध्ये अग्निदेवतेची पूजा केली जात असे जे जे आपण अग्निला अर्पण करू ते ते अग्नि आपल्याला देईल अशी मान्यता होती. तशाच संकल्पना या पद्धती रूढ होण्यामागे जाणवतात. 

महाराष्ट्रात गुढी पाडव्यापासून अक्षय्यतृतीयेपर्यंत म्हणजे साधारण एक महिना चैत्रगौरीचे पूजन आणि हळदी कुंकू केले जाते. यानिमित्ताने मैत्रिणी एकत्र जाणत्यामुळे उन्हाळा आल्हाददायक होतो. मग थकवा घालवण्यासाठी कैरीचे पन्हे आणि डाळ वाटली जाते. चैत्रगौर म्हणजे झोपल्यात बसलेली देवीची प्रतिमा ,तिचे पूजन केले जाते. गौरी माहेरी आली असे मानले जाते. किंवा अन्नपूर्णेच्या मूर्तीची पूजा केली जाते. या ऋतुत येणारी वेगवेगळी फळे  ही आरास रचून पूजा केली जाते. पण विशेष महत्व असते ते म्हणजे या काळात येणारी कैरी वापरून केलेले पन्हे , आंब्याची डाळ आणि ओटीला भिजवलेले चणे.  

हरभरा साधारण मार्च मध्ये शेतातून घरी येतो. आपल्याकडे शेती आणि सणवार हातात हात घालून च चालतात असे बऱ्याचदा जाणवते. पुढे येणाऱ्या सणाला त्याचे दान. म्हणून हे भिजवलेले हरभरे चांगले पोटभरीचे ठरतात. या दिवसात शरीराला तरतरी यावी, थंडावा मिळावा म्हणून कैरीचे पन्हे तर हरभरा डाळ भिजवून कैरीचा कीस घालून वाटून केली जाते. या दिवसात अन्न खाण्याची इच्छा होत नाही. असे आंबट चवदार काही बरे वाटते त्यासाठी ही कैरीचे डाळ उत्तम होते. आणि कैरीमुळे हरभऱ्याच्या रुक्षतेचाही त्रास होत नाही.  वातकर होत नाही. फक्त चामच्याचे प्रमाण वाटीवर नेऊ नये म्हणजे झाले! चला तर मग साहित्य आणि कृती बघूया. पन्हे आणि कैरीची डाळ किंवा आंबा डाळ. 


कैरीचे पन्हे : 

साहित्य : कैरी, १

कैरी फार आंबट असेल तर खडीसाखर आणि कलमी असेल तर गूळ ( अथवा आपल्या आवडीनुसार) 

उकडलेल्या कैरीचा गर एक वाटी 

जेवढा गर तेवढा गूळ किंवा ३/४ कप खडीसाखर  

सैंधव मीठ १ टीस्पून

विलायची पूड १ टीस्पून

जिरेपूड १/२ टीस्पून

केशर ४-५ काड्या

कृती :

सर्वप्रथम कैरी उकडून घ्यावी.

तिचा गर काढून घ्यावा

एकीकडे साखर किंवा गूळ बारीक करून  घ्यावे. 

मिक्सर मध्ये आधी कैरीचा गर, खडीसाखर, सैंधव, केशर, विलायची पूड, जिरेपूड, खडीसाखर एकत्र बारीक करून घ्यावे. 

हा गर लागेल तसा घेऊन पाणी घालून प्यायला घेता येते. 


कैरीची डाळ :

भिजवलेली हरभरा डाळ १ वाटी

कैरी १/२ ते ३/४ वाटी

कोथिंबीर बारीक चिरलेली १/४ वाटी

मिरची १-२ / आवडीनुसार किती तिखट आहे त्यानुसार

साखर २ चमचे

मीठ १ चमचा 

जिरे १ टीस्पून

मोहरी १ टीस्पून

कडीपत्ता ७-८ पाने

हिंग १/४ टीस्पूनहळद १/२ टीस्पून

तेल २ टेस्पून

कृती :

१. भिजवलेली डाळ, थोडी मिरची वाटणात थोडी फोडणीसाठी ठेवावी , मीठ, साखर गळून एकत्र वाटून घ्यावी. मिश्रण वाटताना फार बारीक नको काहीसे जाडसर हवे. 

२. त्यामध्ये कैरीचा कीस घालून चांगले मिसळून घ्यावे.

३. नंतर एक भांड्यामध्ये काढून त्यावर  फोडणी घालावी त्यासाठी तेल तापत ठेवावे तेल तापल्यावर त्यात मोहरी घालावी, मोहरी तडतडली, जिरे घालावे त्यानंतर हिंग, मिरची, कडीपत्ता, हळद याप्रमाणे घालून गॅस बंद करावा व ही फोडणी वाटलेल्या डाळीवर घालावी.  

गणपती मध्ये बाप्पाला निरोप देताना अशीच डाळ केली जाते त्यामध्ये त्या दिवसात कैरी मिळत नाही त्यामुळे लिंबाचा रस घातला जातो.

गुणधर्म : 

१. पन्हे हे उन्हाळ्यात उत्तम पेय ठरते. हे प्रीणन कार्य करते अर्थात् यामुळे तरतरी येते. 

२. उन्हाळ्यामध्ये अन्न खायची फारशी इच्छा होत नाही. तोंडाला कोरड पडते. थकवा वाटतो. अशा वेळी तोंडाला चव यावी, थकवा दूर व्हावा म्हणून पन्हे चांगले काम करते. 

३. हरभरा डाळ ही चवदार पण रुक्ष आणि वातकर आहे त्यामुळे कैरी आणि वरून घातलेली फोडणी यामुळे ती पचायला सुलभ होते.आपले पूर्वज खरंच किती हुशार होते!

४. डाव्या बाजूला चटणी प्रमाणे वाढली तर अन्न रुचकर लागते, कैरीच्या अंगभूत गुणामुळे अग्नि चांगला प्रदीप्त होतो. सर्व रस म्हणजे सर्व चवींचा उत्तम मेळ या डाळीमध्ये उत्तम प्रकारे साधला जातो.

५. ज्यांना पित्ताचा त्रास असेल त्यांनी गुळाच्या ऐवजी खडीसाखरेचे पन्हे घ्यावे. आणि कैरीची डाळ वाटताना त्यामध्ये १/२ वाटी ओल्या नारळाचा जव घालावा. 

६. आधुनिकदृष्ट्या बघता ही डाळ प्रोटीन्स आणि iron चा उत्तम स्रोत आहे. आणि कैरी व्हिटामिन C चा! हे iron  शरीरात व्यवस्थितरीत्या शोषले जावे यासाठी व्हिटामिन C ची गरज असते अन्यथा ते व्यर्थ होते आणि पचायला जड होते म्हणून हे कॉम्बिनेशन! आहे की नाही कमाल! 

अशा प्रकारे तुम्ही कैरीची डाळ कशी करतात ते आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनपर्यंत केली नसेल तर नक्की करून बघा. भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थ खूप छान, वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्यांच्यामागे शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत. तीच आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आवडल्यास नक्की शेअर करा. 

(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)


वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833




Thursday, April 17, 2025

Summer Cold drinks.. Helpful or harmful?

                                                   

                                                 उन्हाळ्यातील कोल्ड्रिंक्स.. उपकारक की अपायकारक?


  

उन्हाळा सुरु झाल्या झाल्या दुकानांमध्ये थंड पेयाच्या भिंतीच्या भिंती उभ्या राहतात. वेगवेगळ्या  सरबताच्या बाटल्या, प्रीमिक्सस, वेगवेगळे फ्रुट्स क्रश, वेगवेगळे स्क्वाशेस ,कार्बोनेटेड कोल्ड्रिंक्स, त्यात भर म्हणजे रस्त्यावर मिळणारे बर्फाचे गोळे, आईस क्रीम्स, या सगळ्याचे वेवेगले रंग दिसायला खूप सुंदर दिसतात. असे असले तरीदेखील ते शरीराला फायदेशीर आहेत का? की अपायकारक आहेत? शरीराला नक्की थंडावा देतात का? हे थोडस समजून घेऊया. हे cold drinks ठंडा ठंडा...cool cool नसून एक दिशाभूल आहे.  

उन्हाळ्यात आरोग्याकडे विशेष लक्ष का दिले जाते? ६ ऋतुबद्दल माहिती आपण विस्तृतपणे नंतर बघूया. सध्या आपण साधारण ३ ऋतूंचा विचार केला तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हिवाळ्यात अग्नी चांगला असतो अगदी काहीही पचवू शकतो. पावसाळ्यात घ्यावयाची काळजी नैसर्गिकरीत्या आपण घेतो. पण उन्हाळा म्हणजे संभ्रम असतो की वरती ऊन तापतय, अंगाची लाही लाही होते, तोंडाला कोरड पडते, अग्नी मंदावतो, हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कामानिमित्त बाहेर पडणे भाग आहे, लग्न सराई मुळे प्रवास असतोच. अशा वेळी संभ्रम असतो नेमकी काळजी कशी घ्यावी? त्यातच वेगवेगळी थंड पेय भुरळ घालतात. 

मुळात हे नेमके कसे तयार केले जातात हे थोड समजून घेऊया. सरबत तयार करताना ग्लुकोज सिरप त्यामध्ये जे सरबत हवे त्याचा फ्लेवर, त्यानुसार कलर, टिकण्यासाठी प्रिझर्वेटीव, सायट्रिक ऐसिड असा साधारण फॉर्म्युला असतो. आता यात एकही पदार्थ किंवा घटक द्रव्य नैसर्गिक नाही. कृत्रिमरीत्या तयार केलेले आहे. FSSAI मानकानुसार ते खाण्यास सुरक्षित असले तरीही ते chemically processed असतात. त्यामुळे शरीरावर त्याचा परिणाम होतो. थोड्या प्रमाणात नसला तरीही वारंवार घेतल्याने ते शरीराला अपायकारक ठरू शकतात. आयुर्वेदानुसार याची गणना गर विष या प्रकारामध्ये केली जाते. अर्थात विषाचा एक प्रकार, म्हणजे शरीरावर याचा परिणाम एखाद्या slow poison सारखा होतो. मग यापेक्षा साखरेचे पाणी करून पिणे बरे असे म्हणायला हरकत नाही.! 

हे समजू शकतो की हे पदार्थ भुरळ घालतात ते कधीतरी घेण्यास, पर्याय नसल्यास हरकत नाही, पण नेहमी नको. आणि लहान मुलांना तर नकोच नको! कारण त्यांची पचनशक्ती नाजूक असते, अजून शरीर  अवयव  प्रगत होत असतात अशा वेळी त्यांना असे पदार्थ देणे टाळावे. यातील कृत्रिमरित्या तयार केलेल्या घटकांबद्दल आणखी   थोड तपशीलवार बघूया.                              

Tartrazine (Yellow 5) : बऱ्याच पिवळ्या रंगाच्या पेयांमध्ये हा रंग वापरला जातो. याचा परिणाम शरीरावर वेगवेगळ्या Allergies होतात शिवाय लहान मुले hyperactive होतात, चंचलता वाढते. 

Rhodamine B : या रंगामुळे पदार्थांना गुलाबी रंग येतो. कपड्यांच्या कारखान्यात हा रंग वापरला जातो. यावर पदार्थांमध्ये वापरण्याकरिता बंदी आलेली आहे. तरी कधी कधी वापरलेला असू शकतो. याचा परिणाम हा रंग कॅन्सर निर्माण करू शकतो.  

Sodium Benzoate : खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी हे वापरले जाते. सर्वांना साधारणत: माहित असलेले हे preservative आहे. हे जवळपास सर्वच सरबताच्या बाटल्यांमध्ये आढळते. विटामिन C किंवा सायट्रिक acid सोबत संपर्क आल्यास यामुळे तयार होणारे रसायन कॅन्सर निर्माण करणारे ठरू शकते. 

Saccharin / Aspartame: हे sweetener अर्थात् पदार्थाला गोड करण्याच काम करते. साखरेपेक्षा कमी किमतीत हे उपलब्ध होते त्यामुळे साखरेला स्वस्त उपर्याय म्हणून बऱ्याच पदार्थात हे आढळते. पण एवढ गोड पचवण्यासाठी सर्वच जण सक्षम नसतात. त्यामुळे त्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो. डायबेटीस ची शक्यता वाढते. तसेच यामुळे डोकेदुखी चा त्रास उद्भवू शकतो. फालुदा, तयार शेक्स, कोल्ड कॉफी, carbonated ड्रिंक्स मध्ये वापरले जाते. वजन वाढते.


CMC ( Carboxymethyl Cellulose) : हे द्रव पदार्थांना घट्टसर आणि मऊ बनवण्याचे काम करते. हे आईसक्रीम्स, फालुदा, मिल्क शेक्स मध्येआढळते. यामुळे अन्न पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात. 

Guar gum/ Xanthan gum : हे पदार्थांना दाटसर करण्याचे काम करतात. जसे लस्सी. आईस क्रीम्स, फालुदा, कोल्ड कॉफी थिक यामध्ये वापरले जाते. याचा परिणाम पचन संस्थेवर होऊन पचन क्रिया बिघडण्याची शक्यता असते. 

असे वेगवेगळे पदार्थ वापरलेले असू शकतात. संशोधनाने असे सिद्ध झालेले आहे की या पदार्थांमुळे cancer, obesity, fatty liver अशा आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. या लेखाचा उद्देश घाबरवणे नसून केवळ माहितीस्तव आहे जेणेकरून आपण बाहेरचे खताना थोडी सजगपणे काळजी घेऊ शकतो. 

हे पदार्थ खाल्ल्याने लगेच परिणाम होईल असे नाही पण वारंवार नक्कीच खाल्ल्याने होऊ शकतो. त्यामुळे ते टाळावे. लहान मुलांपासून शक्य तेवढे दूर ठेवावे. 

अशा पदार्थांचा शरीरावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून आयुर्वेदाची नक्की मदत होऊ शकेल.

माहिती आवडल्यास शेअर करा , फॉलो करा, तुमचे feedback आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयांबद्दल जाणून घ्यायला आवडले हेही आम्हाला नक्की सांगा. 

  

(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)

Photo Source : Internet



वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833


Summer Cold drinks.. Helpful or harmful?


As soon as summer starts, walls of cold drinks are erected in shops. Different syrup bottles, premixes, different fruit crushes, different squashes, carbonated cold drinks, and to top it off, the ice balls and ice creams available on the road, all of these look very beautiful in their different colors. Despite this, are they beneficial to the body? Or are they harmful? Do they really cool the body? Let's understand this a little.


Why is special attention paid to health in summer? We will see the information about the 6 seasons in detail later. Currently, if we think of 3 seasons, summer, monsoon and winter. Fire is good in winter and we can digest almost anything. We naturally take care of what to take during monsoon. But summer is a time of confusion, the heat is getting hotter, the body gets sweaty, the mouth becomes dry, the digestive fire slows down, in today's stressful life, going out for work is a must, traveling is a must for marriages. At such times, there is confusion, how to take care of it? That's where different cold drinks are tempting.


Let's understand a little about how they are prepared. While preparing syrup, glucose syrup contains a simple formula of the desired syrup, color accordingly, preservatives, citric acid for durability. Now, not a single substance or ingredient in it is natural. It is prepared artificially. Even though they are safe to eat according to FSSAI standards, they are chemically processed. Therefore, it affects the body. Even if it is not in small quantities, if taken repeatedly, it can be harmful to the body. According to Ayurveda, it is considered a type of poison. That is, a type of poison, meaning that its effect on the body is like a slow poison. Then it is better to drink sugar water than this.!


It is understandable that these substances are tempting to take sometimes, if there is no alternative, it is okay, but not always. And especially not for small children! Because their digestive power is delicate, they should avoid giving such substances at a time when their body organs are still developing. Let's look at these artificially prepared ingredients in more detail.


Tartrazine (Yellow 5): This color is used in many yellow-colored drinks. This results in various allergies in the body and also makes children hyperactive and restless.


Rhodamine B: This color gives vibrant pink color to foods. This color is used in clothing factories. It has been banned for use in foods. However, it may have been used sometimes. This color can cause cancer.


Sodium Benzoate: It is used to preserve foods. This is a preservative that everyone knows. It is found in almost all syrup bottles. If it comes into contact with vitamin C or citric acid, the chemical produced by it can cause cancer.


Saccharin / Aspartame: This sweetener works to sweeten the food. It is available at a lower price than sugar, so it is found in many foods as a cheap alternative to sugar. But not everyone is able to digest such sweetness. Therefore, it affects the digestive system. The possibility of diabetes increases. This can cause headaches. It is used in Falooda, ready-made shakes, cold coffee, carbonated drinks.


CMC (Carboxymethyl Cellulose): It works to thicken and soften liquids. It is found in ice creams, Falooda, milk shakes. This can cause digestive problems.


Guar gum/ Xanthan gum: It works to thicken foods. Like lassi. It is used in ice creams, Falooda, cold coffee thick. This can affect the digestive system and cause digestive problems.


Such different chemically processed substances may be used. Research has proven that these foods are causing the health issues like dibetes, cancer, obesity, fatty liver. The purpose of this article is not to scare but only for information so that we can be a little more careful when eating outside.

Eating these substances may not have an immediate effect, but eating them repeatedly can definitely cause it. Therefore, they should be avoided. Keep them as far away from children as possible.

Ayurveda can definitely help prevent such substances from having a bad effect on the body.


If you like the information, share, follow, be sure to send us your feedback and also tell us what other topics you would like to know about.


(While sharing the article, it is okay to share it with the author's name)

Photo Source : Internet


Vaidya Revati Sakhare – Garge

Ayurved Consultant and dietician

Treedal Ayurveda Clinic, Shaniwar Peth, Pune

8010454807

7219899833

Monday, April 7, 2025

गोंद कतीरा

                                    गोंद कतीरा         


गूळापासून ऊसाच्या रसाच्या घवघवीत यशानंतर गेल्या वर्षी ताडगोळ्याला वेडावाकडा ताडल्यानंतर यंदा वर्णी लागलीय गोंद कतीरा ची..!

कधीपासून गोंद कतीरा वापरून केलेले so called Coolers चे व्हिडिओ दिसताहेत.

परवा मैत्रिणीसोबत पण विषय झाला.

न राहवून शेवटी आज जरा अधिक खोलवर बघितले की गोंद कतीरा वापरुन मार्केट में क्या नया है?

तर गोंद कतीरा घालून, त्यामध्ये फळे, दुध.!

गोंद कतीरा घालून भरपूर बदाम घातलेले दुध.!

गोंद कतीरा आणि भरपूर म्हणजे एका ग्लास साठी किमान ५-६ बर्फाचे खडे घालून केलेले सरबत किंवा पेय.!

अशा अनेक recipes, एका मावशींनी तर खाली custard आणि त्यावर गोंद कतीरा चे आच्छादन केलेले होते.

मला भारतीय स्त्रियांचे कायम कौतुक वाटते की त्यांना “कोंड्याचे मांडे” करण्याची कला उपजतच असते.

पण आला एखादा trend की काहीही शहानिशा न करता viral करत बसायच म्हणजे जरा जास्तच होतं!

याच्या background ला “यह गोंद कतीरा bone density बढाता है” अस सांगणारा एक आवाज play होतो.

शरीराला थंडावा देतो आणि bone density वाढवतो एवढंच काय ते लक्षात घेतलेलं.

आणि आता bone density normal आहे की नाही हे कोणी ठरवायचं? त्याचे निकष काय? पाहिलंय का? तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे का?

मूळात कोणताही पदार्थ सेवन करण्याची पध्दत महत्वाची आहे.

दुधामध्ये फळे गोंद कतीरा हे योग्य नाही भरमसाठ फळं त्यामध्ये आणि ढीगभर बर्फ हेही योग्य नाही.

गोंद कतीरा हा एक प्रकारचा डिंक आहे. जो पाणी घातल्याने जवळपास ४ पट फुलतो. हा शीतल आहे म्हणजे गुणांनी थंड आहे. दाह कमी करणारा आहे. काहीसा सारक म्हणजे पोट साफ करणारा, तर गुरु म्हणजे पचायला जड आहे. त्यामुळे ज्यांना अन्नपचनाचा त्रास आहे, त्यांनी मर्यादेतच घ्यावे. रक्तस्तंभन करणारा म्हणजे रक्त थांबवणारा आहे. त्यामुळे ज्या महिलांना पाळी येत नाही, किंवा पाळीच्या वेळी रक्तस्त्राव कमी होतो अशा महिलांनी टाळावे किंवा अल्प मात्रेत , क्वचित् घ्यावा. ज्यांना उन्हाळ्यात घोळणा फुटण्याची तक्रार असेल ते घेऊ शकतात.

हाडांसाठी चांगला असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणात बर्फ घातल्याने त्यामधील (अति)शीत गुणाने हाडांना त्रासदायकच ठरणार आहे. आणि दुध, फळं आयुर्वेदानुसार विरुध्द आहे तर गोंद कतीरा घ्यायचाच असेल तर कसा घ्यायचा तर एखाद्या सरबतात जे माठातले पाणी वापरुन बिनाबर्फ केलेले आहे जसं लिंबू सरबत, आवळा, सरबत, कोकम सरबत, वाळा सरबत यामध्ये भिजवून फुललेला एक छोटा चमचा डिंक म्हणजे गोंद कतीरा त्यामध्ये विलायची पूड, घालून घ्यावे.

इतर अनेक थंडावा देणारे पदार्थ आहेत त्यांचा समावेश करावा.

नारळपाणी, काळ्या मनुकांचे पाणी, डाळिंबाचे सरबत, धन्याचे सरबत, आंबील, ताक, इ.

वेगवेगळी सरबते यासाठी ब्लॉग बघू शकता त्याची लिंक देत आहे.

https://drrevatigarge.blogspot.com/2018/04/blog-post_18.html


(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)

Photo Source : Internet



वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833


Friday, April 4, 2025

सुंठवडा/ Sunthvada

                                                                   सुंठवडा

                  रामनवमी निमित्त सुंठवडा करण्याची पद्धत अनेक ठिकाणी असते. बऱ्याच मंदिरात, घरोघरी प्रसाद म्हणून सुंठवडा केला जातो. याला पंजिरी असेही म्हणतात. पंजाब मध्ये सुद्धा पंजिरी केली जाते. पण तिची पद्धत जरा वेगळी आहे. 

                     आपले सणवार आणि निसर्गचक्र हातात हात घालूनच चालतात. रामनवमी चैत्र महिन्यात येते. यावेळी वसंत ऋतू असतो. ऊन तापायला सुरुवात झालेली असते. आधीच्या ऋतुमध्ये वाढलेला कफ या ऋतुंमध्ये आयुर्वेदातील पंचकर्म शोधन प्रक्रियेने प्रकृती आणि व्यक्तीनुसार बाहेर काढणे अपेक्षित असते. यासाठी आयुर्वेद तज्ञांचे मार्गदर्शन , सल्ला घेता येऊ शकतो. याच काळात भूक , पचनशक्ती जरा मंदावते. पुढे येणाऱ्या ऋतुंमधील उष्णतेने पित्त वाढू शकते हे सगळे रोखण्यासाठी सणावारांना वेगवेगळ्या पद्धतीने खाद्यपदार्थ, पेय करण्याच्या प्रथा रूढ झालेल्या दिसून येतात. तसाच एक प्रकार म्हणजे सुंठवडा.! कसा करायचा हे समजून घेऊया.! नावातच सुंठ असल्याने सुंठ हा महत्वाचा घटक आहे हे साहजिकच आले. ऋतुसंधीच्या काळी आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते. राम नवमी आणि जन्माष्टमी साधारण अशा ऋतुसंधी काळी च येतात. जन्माष्टमी ला सुद्धा सुंठवडा करण्याची पद्धत दिसून येते. 

                    सुंठ आयुर्वेदीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे औषध. हिला विश्वभेषज असेही म्हटलेले आहे. संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी अशी ही विश्वा! आले ठराविक प्रक्रियेने वाळवून सुंठ तयार केली जाते. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशेष बदल होतो तो गुणांमध्ये आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे "संस्कारो हि गुणांतर्धानम्" अर्थात् संस्काराने गुणांमध्ये बदल होतात. हे खरे तर व्यवहारातही दिसून येते. जसे कुंभार मातीचे घडे तयार करतो, एक विशिष्ट प्रकारे ते घडवले जाते, आकार देऊन भट्टीत भाजले जाते. ते ते वापरण्यायोग्य होते. लहान मुलावर संस्कार करून  एक चांगले व्यक्तिमत्व घडवता येते. तसेच संस्काराचे महत्व आहे. आहारामध्ये तर विशेष आहे. अशीच प्रक्रिया आले आणि सुंठीबाबत घडून येते. आले पूर्वी गुणांनी उष्ण, कटुविपाक असतो तर वाळवून , काळाचा संस्कार झाल्यावर सुंठ मधुर विपाकी म्हणजे आल्यापेक्षा सौम्य गुणाची होते. आणि या ऋतूसाठी सुसह्य होते. सुंठ आमाचे म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनपद्धतीमुळे म्हणजे lifestyle मुळे तयार होणारे विषार शरीरात वेगवेगळे व्याधी निर्माण करण्याकरिता कारणीभूत ठरतो ते टाळण्याचे काम सुंठ उत्तमरित्या करते. म्हणून  सुंठ या पद्धतीने वापर करणे हा यामागील विचार आहे. 

सुंठवडा/पंजिरी :

साहित्य: 

सुंठ पावडर  १ टेस्पून / १० ग्रॅम 

खडीसाखर १.५ टेस्पून / १५ ग्रॅम 

धने  १.५ टेस्पून / १५ ग्रॅम 

खोबऱ्याचा किस/ पातळ काप १.५ टेस्पून / १५ ग्रॅम 

ओवा १/२ टेस्पून / ५ ग्रॅम

विलायची १/२ टेस्पून / ५ ग्रॅम

कृती : 

धने आणि खोबरे हलके भाजून घ्यावे. 

खडीसाखर अगोदर थोडी बारीक करून घ्यावी.

 आता सर्व घटक एकत्रित करून मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक करून घ्यावे. 

सुंठवडा किंवा पंजिरी तयार ! 

सुंठवडा पुढचे निदान ७ दिवस एक छोटा चमचाभर जेवणानंतर किंवा सकाळी नाश्त्यानंतर खाता येऊ शकतो. 

बडिशेपेसोबतही खाण्यास हरकत नाही.

सुंठ : भूक वाढणारी, उत्साहवर्धक, आहे.

धने : त्रिदोषशामक

खडीसाखर : पित्तशामक

ओवा : कफ कमी करणारा, अन्नपचनास उपयुक्त , काहीसा पित्त करणारा म्हणून पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी काळजी खाताना काळजी घ्यावी

विलायची : चव आणि भूक वाढवणारी ,पित्त कमी करणारी

अशाप्रकारे सणवार आणि रूढी परंपरा यामागे शास्त्रीय कारणे असतात. ऋतु, निसर्ग यांचा बारकाईने विचार केलेला असतो त्यामुळे ते समजून घेऊन आपण ते जपायला हवे. जेणेकरून आपण आरोग्यपूर्ण आयुष्य जगू शकतो. 

प्रभू श्रीराम उत्तम आरोग्य प्रदान करो.!

रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.! 


Sunthvada :


There is a tradition of making Sunthavada on the occasion of Ram Navami in many places. In Maharashtra Sunthavada is pepared as a prasad in many temples, and almost every household. It is also called Panjiri. Panjiri is also made in Punjab. But its method is a little different. Sunthvada is prepared during Janmashtami also. When there is change in Season it tends to fall sick during the time. This kind of rituals are set to follow to face the transit and increase the immunity & helps to prevent falling sick. 


Our festivals and natural cycles go hand in hand. Ram Navami is celebrated in the month of Chaitra. At this time, it is spring. The heat has started to heat up. The kaph dosh that has increased in the previous season is expected to be removed in these seasons according to the nature and the individual through the Panchakarma Shodhan process of Ayurveda. For this, the guidance and advice of Ayurveda experts can be taken. During this period, appetite and digestion slow down a bit. To prevent all this, the practice of making food and drinks in different ways has become common during festivals. One such type is Sunthavada.! Let's understand how to do it.!

How to prepare:

1 tbsp roasted Dry coconut,

1 tbsp roasted Coriander seeds(Dhaniya)

1 tbsp Candy sugar

1/2 tbsp Dry ginger powder

1/2 tbsp Ajwain

Grind them together.

One can have Sunthvada  atleast for next 7 days after meals, 1/2 tsp (like Prasad).


Benefits:

Coconut: Gives energy, reduces pitta.

Coriander seeds: Balances all three doshas.

Candy sugar: reduces body heat, controls excess thirst

Dry ginger: Reduces lethargy, increases intestinal fire.

Ajawain: Reduces excess kapha, good for digestion. Those having pitta prakruti should be careful about consumption


May Shriram bless all with good health and prosperity!



(लेख शेअर करताना लेखिकेच्या नावासह शेअर करण्यास हरकत नाही)

(When sharing the article, please include the author's name)


वैद्य रेवती साखरे – गर्गे

आयुर्वेद चिकित्सक आणि आहारतज्ञ

त्रिदल आयुर्वेद क्लिनिक , शनिवार पेठ, पुणे

8010454807

7219899833

Jowar Paratha

                                                                    ज्वारीचा पराठा किंवा दशमी ज्वारीला जोंधळे असेही म्हणतात याशिवाय याची वेग...